आज जग भरातील देशांमधे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती साजरी होत आहे. ज्या विचारवंताचे सर्व जगभर अनुयायी आहेत असे फार थोड़े विचारवंत या पृथ्वीवर होऊन गेले. त्या मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात वर नंबर लागतो ही बाब निश्चितच खुप कौतुकस्पद अशी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न ठरतात त्याचे मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांचे यक्तिमहत्व हे हरहुन्नरी व अनेक विविध क्षेत्रामधे काम करणारे होते म्हणूनच बाबासाहेबांना “The Man With Multiple Facets” असे म्हटले आहे म्हटले जाते बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने दुरदृष्टी बाळगणारे एकमेव भारतीय नेते होते असे म्हटल्यास अतिश्योक्ति ठरू नये, बाबासाहेबांचे भारतीयांच्या उत्थानासाठी अतिशय महत्वाचे योगदान राहिले आहे. बाबासाहेबांनी भारतीय संमाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल या दृष्टीने खुप महत्वपूर्ण असे कार्य केले आहे. बाबासाहेबांनी मंजूर, शेतकरी, वीजनिर्मिती, जलसिंचन, सामाजिक न्याय, शिक्षण, कायदा, अशा अनेक क्षेत्रासाठी अनमोल असे योगदान दिल आहे. बाबासाहेब मजुर मंत्री असताना मजुरांसाठी बाबासाहेबांनी उलेखनीय असे कार्य केले आहे. बाबासाहेबांचे मजुरासाठी कार्य : १) औद्योगिक कामगारांची कामाची वेळ आठ तास केली, Reductiion in factory working up to 8 hours,२) महिलांना प्रस्तुति रजा, ३)महिला कामगार वेलफैअर फंड निर्मिती ४) महिला व बालकामगार संरक्षण कायदा (Women and child labour protection act.), ५) महिला खाणकामगार यांना संरक्षण- Restoration of fan oh employment of women in underground work in coil mines, ६) भारतीय फॅक्टरी कायदा (Indian Factory Act)1948, ७) एम्प्लॉइमेन्ट एक्सचेंजची स्थापना, ८) कामगार विमा ( Employees state insurance) ESI, ९) डियरनेस अलाउंस DA, १०) रिव्हीजन ऑफ पे स्कल फॉर एम्प्लॉइज, ११) कोल अण्ड मायका माइन्स प्रॉव्हिडंट फंड, १२) लेबर वेलफेअर फंड, १३) पोस्ट वॉर इकॉनामिक प्लानिंग, १४) प्रोव्हिडंट अँक्ट, १५)इंडियन स्टॅटीस्टीकल लॉ, १६) लेबर डिस्प्यूट अँक्ट,१७) मिनीमम वेजेस अँक्ट, १८) कायदेशीर संपाचा अधिकार, १९)इंडियन ट्रेड यूनियन बिल. बाबासाहेबांनी वरील प्रमाणे कामगारांसाठी योगदान दिलेले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी शेती व सिंचन क्षेत्रासाठी हीराकुड व्हॅली प्रोजेक्ट, दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, सोनी रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट असे देशाच्या विकासास कारणीभूत महत्वाचे प्रोजेक्ट स्वत: लक्ष देऊन,कष्ट घेऊन पूर्ण केले आहेत. महिलांसाठी बाबासाहेबांचे योगदान : स्रियांना समाजात समान संधी मिळावी, मुलगा व मुलगी यांना समान हक्क मिळावेत, पिता व पतीच्या संपत्तीमधे स्त्रीयांना वारसा हक्क मिळावा यासाठी बाबासाहेबांनी हिंदु कोड बिल संसदेमधे मांडले होते. ते तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी खुप परिश्रम घेतले होते. तात्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरुनी हिंदु कोड बिल मंजूर करण्यास नकार दिला त्या मुळे बाबासाहेबांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या बिलास प्रतिगामी विचारधारेचे नेते शामाप्रसाद मुखर्जी यांनी तिव्र विरोध दर्शविला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर हिंदु कोड बिल टप्या टप्याने मंजूर करण्यात आले तरतुदी आज ही स्वीकारल्या गेल्या आहेत. स्त्रीयांना ३३% मिळालेले राजकीय आरक्षण ही देखील त्यातलीच एक तरतुद आहे. पण दू्रदैवने देशातील स्त्रीयांना त्यांचे जीवन सुखकर कोणी केले त्यांना स्वतंत्र्य कोणी मिळवून दिले जे आयुष्य हजारो वर्षापासून गुलामीत अडकले होते. त्या गुलामातुन त्यांना कोणी मुक्त केले याची फारशी कल्पना नाही याचे नवल वाटल्या शिवाय राहत नाही. आज आपण पाहत आहोत आपल्या पदाला सत्तेला चिकटुन बसलेले नेते,पुढारी जनतेच्या विकासाच्या, सुरक्षिततेच्या मोठ्या मोठ्या बाता मारत असतात पण त्यात अयशस्वी ठरल्याने कोणीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवत नाहीत. सत्ता काबिज करण्यासाठी संपूर्ण समाजाला दावनिला बांधणाऱ्या नेत्यांनी बाबासाहेबांच्या प्रमाणे आपल्या मंत्री पदाला लाथ मारण्याचे धाडस आज ही कोणी दखवेल अशी पुसटशी आशा देखील या भोळ्या जनतेने ठेवणे आत्मघातकीच म्हणावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऊर्जाक्षेत्रात खुप महत्वाची व गरजेची असलेली “ग्रीड पद्धत” (विजेची वितरण पद्धत) आज देखील यशस्वीपणे सुरु आहे. मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी सुरु केलेली शिष्यवृती योजनेमुळे हजारो विद्यार्थी तंत्रशिक्षणासाठी परदेशी जात असुन तेथील अद्ययावंत तंत्रज्ञान घेऊन मायदेशी परतत आहेत. ऊर्जा निर्मिती व्यवस्था , जल ऊर्जा स्थानक, जल विद्युत यंत्रणा व अशा अनेक बाबींवर अभ्यास करणे व मार्ग काढण्यासाठी बाबासाहेबांनी (CTPB) स्थापना केली होती. बाबासाहेबांच्या अखत्यारीत असलेल्या कामगार विभागाने दोन महत्वाचे निर्णय घेतले. पहिला म्हणजे भारतीय अभियंत्यांना परदेशात विद्युत तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षण देणे दुसरा म्हणजे विद्युत क्षेत्रासाठी लागणारी मशिनरी भारतात बनविण्यासाठी पावले उचलली. कामगार विभागाने केंद्रात विद्युत पुरवठा विभागाची स्थापना केली व विद्युत संस्थामधील लेखा जोखा संबंधीची मार्गदर्शक तत्व प्रणाली तयार केली. विद्युत क्षेत्र समाजातील प्रत्येक घटकासाठी उन्नतीचे साधन व्हावे म्हणून त्यांना सार्वजनिक करण्यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घेऊन विद्युत पुरवठा कायदा १९४८ बनविण्यात आला. विद्युत पुरवठा कायदा १९४८ नुसार विविध राज्यांमधे विद्युत मंडळाची स्थापना झाली व विद्युत क्षेत्र सर्वासाठी खुले झाले. बाबासाहेबांचे शेतकारयांसाठी योगदान : बाबासाहेबांनी कामगार व शेतकारयासाठी अनेक लढे दिले. कोकणातील खोती पद्धत नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक परिषदा घेतल्या. मुंबई विधिमंडळामधे त्या अनुषंघाने विधेयक मांडले. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी मांडण्यासाठी विधिमंडळावर मोर्च्या नेला. याशिवाय कृषि विकासाची संकल्पना,आधुनिक बी-बियाणे पुरविणे, खरेदीसाठी विक्री संघाची शेतकी औजारे पुरविणे बाबासाहेबांमुळेच पुढे आल्या. बाबासाहेबांचे शैक्षिणक कार्य : महाराष्ट्रा मधे सक्तीचे शिक्षण सुरु करावे या साठी बाबासाहेबांना पाठपुरावा करावा लागला होता. ६ में १९२९ रोजी मुंबई सरकारचे शिक्षण मंत्री मैालबी रफीउद्दीन यांनी प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात महाबलेश्वर येथे शिक्षण परिषद केली होती. या परिषदेस बाबासाहेबांना निमंत्रित केले होते. महाबलेश्वर येथील शिक्षण परिषदेस मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणाले होते,प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वागीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशीवर हा प्रश्न सोपविल्यास प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा लागतो. आघडिस आलेल्या जगातील सर्व देशांनी सक्तीचा कायदा करुनच लोकांची निरक्षरता हद्दपार केली असे आपणास दिसून येते. बाबासाहेबांनी मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज अशा शिक्षण संस्थाची स्थापना केली. शिवाय मोठी शिक्षण संस्था स्थापना करण्यासाठी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे शकडो एकर जमिन खरेदी करून ठेवली होती. बाबासाहेबांनी ब्रिटिश गव्हर्नर लिन लिथ गो यांच्याशी संपर्क साधुन ३ लाख रुपये मिळविले होते व त्या रकमेतुन १६ विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविले. असे कार्य करणारा नेता बाबासाहेबांशिवाय आजतागायत माझ्या ऐकण्यात नाही. बाबासाहेब हे एक उच्च प्रतीचे पत्रकार देखील होते. बहुजन समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी बाबासाहेबांनी मुकनायक (१९२० साली), बहिष्कृत भारत (१९२७ साली) ,जनता (१९३०साली),प्रबुद्ध भारत (१९५६साली) ही वृत्तपत्र सुरु केली. बाबासाहेबांनी वाढती लोकसंख्या व वाढते दारिद्रय या वर अभ्यास करून संतती नियमनासाठी सखोल अभ्यास करून आपले विचार मांडले. ते विचार हे तत्कालीन संस्कृतीच्या ठेकेदारांना सहज रुचनारे होते असे नाही बाबासाहेबांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात संतती नियमनाच्या उपाययोजनांच्या अशासकीय ठराव १०नोव्हेबर १९३२ साली मांडला. श्री.पी.जे. रहीम हे या ठरावाचे सूचक तर के.बी.गायकवाड अनुमोदक होते. या अशासकीय ठरावात “कुटुंब मर्यादित करण्याची निकडीची गरज लक्षात घेता या प्रांतातील जनतेमध्ये संतती नियमनाच्या बाबतीत एक प्रभावी प्रचार मोहीम हाती घ्यावी व प्रत्यक्षात जन्म नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पुरेशा प्रमाणात सोयी पूरवाव्यात” अशी शिफारस करण्यात आली होती. ठराव हा ठराव डॉ.बाबासाहेब आंबेडकर माडणार होते, पण ते विधिमंडळात बैठकीस उपस्थित राहु शकले नाहीत. तात्कालीन आरोग्यमंत्री डॉ. गोल्डर व काग्रेसचे नेते बाळासाहेब खेर हे ‘मनोनिग्रह’ आणि संयमाने संततीनियमन करण्याचा उपाय सांगून मोकळे झाले. संतती नियमन स्रियांसाठी वरदान ठरणार आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा संबधं दारिद्रय निवारणाशी लावताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध दृष्टीने त्याची कारणमिमांस करतात ती पुढील प्रमाणे १) दरिद्रय निवारण करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे २) लोक संख्या वाढीमुळे केवळ अन्नधान्य पुरवठयावरच ताण पडतो असे नाही तर शिक्षण, आरोग्य व अन्य सुविधांवर ताण पडतो. ३) लोकसंख्या वाढीमुळे देशातील जंगले, जमिनी आणि चराऊ जमिनी लागवाडी खाली आणली गेली. परिणामी शेती उपयुक्त जनावरांच्या चरण्याची गैरसोय झाल्याने त्यांची संख्या कमी झाली.त्यामुळे शेतील शेन्द्रिय खताचा पुरवठा कमी होतो. ४) लोकसंख्या वाढीमुळे शेतीचे छोटे-छोटे तुकडे होतात परिणामी शेतकरी दारिद्र्य बनतो ५) दरिद्र्याच मुलांच्या जन्माचे प्रमाण अधिक असते. त्या मुळे अन्ना बाबतच्या उपासमारी लैंगीक भूक वाढते. ६) दारिद्र्यात पुरेसे पौष्टिक अन्न न मिळाल्याने आरोग्य बिघडते व बालमृत्यचे प्रमाण वाढते. ७) लोकसंख्या नियंत्रित नसल्याने देशाचे आर्थिक नियोजन शक्य होत नाही. त्या मुळे आर्थिक प्रगती मंदावते. अशा प्रकारचे तंत्र शुद्ध विचार मांडणारे बाबासाहेब हे एकमेव भारतीय नेते होते. त्याच प्रमाणे बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताची तयार केली जी आज देखील आपल्या देशाला उपयुक्त आहे. जी आपले मुलभूत हक्क टिकवते व आपणास आपली मुलभूत कर्तव्य देखील पार पाडण्यास सांगते. बाबासाहेबांनी अनेक विषयांवर सखोल असे कार्य केले आहे. बाबासाहेबांच्या बद्दल मि नेहमी वाचन करत असतो. पण तरी देखील रोज नव्यानेच बाबासाहेब समजत असतात.अशा या बाबासाहेबांचे कार्य या लेखतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की या विश्वरत्नाच्या कार्याचे विवेचन करण्यासाठी एखादे पुस्तक लिहिले तरी ते कमी पडेल. तरी देखील बाबासाहेबांच्या १२७ व्या जयंती निमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मि हे दोन शब्द कागदावर उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचा मुख्य हेतु हाच आहे की बाबासाहेब हे फक्त घटनाकार किंवा दलितांचे नेते म्हणून जगाला दाखवले गेले. त्यांचे जीवनाचे अनेक अनभिज्ञ पैलू भारतीया प्रयन्त पोहोचवावेत आणि बाबासाहेब हे भारतभूमिचे सर्वोत्कृष्ट पुत्र होते. ज्यांनी हा देश घडविण्यासाठी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण खर्ची घातला याची माहिती मिळावी. पुन्हा एकदा सर्व भारतीयांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनःपूर्वक सदिच्छा!
किरण शिंदे
संपादक – निर्भिड पत्रकार
मो. नं. ९५४५४५८३६४