बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०१.२०२२
आष्टी- बीड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पाच नगरपंचायत निवडणुकीचे निकाल काल लागले. त्यात जिल्हातील एकूण ८५जागापैकी सर्वाधिक ४८ जागा भाजपने तर, २१जागावर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. त्यात आष्टी, पाटोदा,शिरूर या तिन्हीही ठिकाणी भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत, आमदार सुरेश धस यांनी आपले निर्वाद वर्चस्व कायम रखले आहे.
राज्यात सतत राजकीय चर्चेत असलेल्या बीड जिल्हात पार पडलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. त्यात, ज्या नगरपंचायतीच्या प्रचारासाठी, आष्टी मतदार संघात, राज्याच्या मंत्री मंडळतील, अनेक बडे मंत्री ज्या मैदानात प्रचाराच्या धुराळा उडवून गेले होते, त्या राजकीय दृष्टया महत्वाच्या व संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागून असलेल्या, आष्टी, पाटोदा,शिरूर या तिन्हीही नगर पंचायतीमध्ये, आष्टीत भाजप – १४ , राष्ट्रवादी – ०२, शिरुर का – भाजपा ११ , राष्ट्रवादी ०४ , शिवसेना ०२, पाटोदा – भाजपा ९ , राष्ट्रवादी ०१ , काँग्रेस ०१,अपक्ष – ६ असे पक्षीय प्राबल्य दाखवत,आपले उमदेवार विजयी केले आहेत.
त्यामुळे आष्टी मतदारसंघात आ . सुरेश धस यांनी पुन्हा एकदा पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्हीही नगरपंचायतीवर आपले निर्विवादपणे वर्चस्व मिळवले आहे. या विजयामुळे माजी मंत्री तथा भाजपा सचिव पंकजाताई मुंडे यांची जिल्ह्यात राजकीय ताकद वाढली आहे. तर विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मात्र या निवडणुकीत म्हणावा तितका जिल्ह्यात विशेष प्रभाव दाखवता आला नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा येत्या काळात,यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत हे निश्चित मानल्या जात आहे.