पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.०१.२०२२
इंदापूर- वालचंदनगर जंक्शन रस्त्यावर झालेल्या अपघातात आनंदनगर येथील घनश्याम देवकीनंदन भाटिया व आशा घनश्याम भाटिया या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुखद घटना मंगळवारी रोजी घडली.हे दोघे पती-पत्नी वालचंदनगरहून जंक्शनकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक बसून हा अपघात झाला
यात त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बुधवारी रोजी आनंदनगर येथील त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. झालेला अपघात गंभीर असून यात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने भाटिया कुटुंबीयांची न भरून निघणारी हानी झाली आहे. कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले आहे. भाटिया कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी पाटील यांनी केली.