चंद्रपूर(निर्भिड पत्रकार नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०६ २०२०
चंद्रपूर- पंचायत समिती चिमूर अंतर्गत येणाऱ्या पळसगांव(पि) येथील ग्राम पंचायतच्या जुन्या इमारतीस सुमारे ३० ते ४० वर्षे झाल्याने इमारत जीर्ण झाली होती. पावसाळ्यात गळती लागत असल्याने कर्मचाऱ्यांसहित नागरिकांनाही याचा त्रास होत होता. याठिकाणी नवीन इमारतीसाठी निधी देण्याची मागणी मागील कमिटीने केली होती, सण २०१७-२०१८ मध्ये जनसुविधा योजने मधून मंजूर करण्यात आली त्याचीच फलश्रुती आज जनसुविधा योजनेंतर्गत १२ लाख रु.चा निधी नूतन इमारतीसाठी मंजूर केला. या निधीतून याठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र सदर ईमारत ही दोन वर्षापासून उदघाटनच्या प्रतीक्षेत होती त्याच नवीन ग्राम पंचायत ईमारतिचे सोशल डिस्टनचे तंतोतंत पालन करून नवीन इमारतीचे उदघाटन, पळसगांव येथील सरपंच सौ. गीता शेंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. केवळ इमारत उत्तम असणे पुरेसे नाही तर या माध्यमातून लोकहिताची उत्तम दर्जाची कामे झाली तरच गावाचा विकास साधला जाईल असे प्रतिपादन गीता शेंडे यांनी वेक्त केले. या वेळी अरुण उंदीरवाडे ग्रामसेवक, ज्ञानेश्वर ढोक उपसरपंच, सुभाष बन्सोड, ग्राम पंचायत सदस्य, ज्ञानेश्वर गुरनुले, महादेव दडमल, शेसिकला गुरनुले, लता चौधरी, ग्राम पंचायत सदस्य गण, भक्तदास कोहचाडे, विकास खोब्रागडे, सुधीर जुमडे, गणेश कोहळे, वासुदेव कोहळे रोजगार सेवक, सदाशिव जुमनाके, अशोक सहरे गावातील ग्रामस्थ व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.