नाशिक (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२३.११.२०२०
येवला- संपूर्ण वीज बिले माफ करू अशी घोषणा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुखांनी केली होती मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ती तर पूर्ण केली नाहीच परंतु महाविकास आघाडी सरकारने लॉकडाउन काळातील भरमसाठ वीज बिल आकारणी करून सक्तीने वसुली करण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारच्या विश्वासघातकी पणाचा निषेध व्यक्त करण्याकरता येवला ग्रामीण भाजपाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन वीज बिलांची होळी करण्यात आली. भाजपाचे नेते बाबा डमाळे पाटील, तालुका अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर शिंदे, आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजता येवला तहसील कार्यालयावर भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुरक्षित अंतर ठेवून जमा झाले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.त्यानंतर नायब तहसीलदार प्रकाश बुरंगुळे यांना निवेदन दिले. या निवेदना बरोबर तालुक्यातील राजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविल्या प्रकरणी काही शिवप्रेमी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे. सदर गुन्हे मागे घेण्यात यावे व त्यांच्या कुटुंबियांना विनाकारण त्रास देऊ नये असे निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यानी तहसील कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली. याप्रसंगी बाबा डमाळे पाटील, डॉक्टर नंदकिशोर शिंदे, आनंद शिंदे, संतोष काटे,छगन दिवटे, संतोष केंदे,बाळासाहेब कुरे, सुधाकर पाटोळे, मच्छिंद्र हाडोळे, युवराज पाटोळे, मयूर मेघराज, सागर नाईकवाडे, शामराव राजवाडे, गोरख कोटमे, लखन पाटोळे, सचिन धकाते आदीसह प्रमुख कार्यकर्ते हजर होते.