रत्नागिरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.१२.२०२०
राजापूर- वडदहसोळ बौध्दवाडी येथील रघुनाथ गोपाळ जाधव (६२) यांनी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ च्या दरम्यान उघडकीस आली. मुंबई महानगरपालिकेत कर्मचारी म्हणुन काम करणारे रघुनाथ जाधव हे निवृत्त झाले होते. रविवारी रात्री ते घरी झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्याची मुलीला जाग आली असता घराचा दरवाजा उघडा दिसला व घरात वडील नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी तिने आजुबाजुला शोधाशोध केली पण रघुनाथ गोपाळ जाधव यांचा शोध लागला नाही. सकाळी पावणेनऊच्या दरम्यान त्यांच्या घरापासुन जवळच पिराची बाग येथील एका झाडाला रघुनाथ जाधव हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळुन आले. ते मयत झाले होते. या घटनेनंतर राजापुर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत जाधव यांच्या आत्महत्येचे कारण कळु शकले नाही. या प्रकरणी महिला पोलीस नाईक हर्षदा चव्हाण अधिक तपास करीत आहेत.