🔹लोकसहभागातून नवी मुंबई विकास आराखडा तयार व्हावा…!!!” हिरामण पगार
मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत दि.२७.०९.२०२२
नवी मुंबई – नुकताच नवी मुंबई विकास आराखडा काही दिवसापूर्वी नवी मुंबई महानगरपालिके तर्फे प्रसिद्ध करण्यात आला होता परंतु, यामध्ये नवी मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीतील नागरिकांना लागणाऱ्या घरकाम, सुरक्षारक्षक, ड्रायव्हर, टॅक्सी, रिक्षा चालक, दूध, पेपर यासारख्या सेवा पुरविणाऱ्या झोपडपट्टी सारख्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या घटकाला वगळून नवी मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यात आला. जवळजवळ ४० ते ५० वस्त्या या विकास आराखड्यातून वगळण्यात आल्या आहेत. लोकसहभागातून विकास आराखडा कसा असावा? वंचित घटकांनी तो समजून घ्यावा. याचे फायदे काय आहेत? या संबंधी युवा संस्था व घर हक्क संघर्ष समिती द्वारे रविवारी २५ सप्टेंबर रोजी खारघर येथे नवी मुंबई विकास आराखडा २०१८-२०३८ चिंतन बैठक आयोजित करण्यात आले होती
आयोजित बैठकीमध्ये नवी मुंबईतील झोपडपट्टी वासियांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यावेळी उपस्थित खाजामीया पटेल नवी मुंबई जिल्हा प्रमुख, रिपब्लिकन सेना, प्रफुल्ल म्हात्रे हॉकर्स नेते, नवी मुंबई, सौ.विनीताताई बाळेकुंद्री महिला उपाध्यक्ष घर हक्क संघर्ष समिती, कैलास सरकटे खजिनदार घर हक्क संघर्ष समिती, राजु वंजारे सचिव घर हक्क संघर्ष समिती, अँड. सुजित निकाळजे मुख्य सल्लागार, घर हक्क संघर्ष समिती, सौ.सुनंदाताई बाविस्कर महिला अध्यक्ष नवी मुंबई, घर हक्क संघर्ष समिती, सिद्धार्थ खरात यांनी मार्गदर्शन केले.