मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०९.२०२२
नवी मुंबई – अनधिकृत बांधकामा विरोधात मुंबई महानगरपालिकेची कारवाई सुरू असून मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने घनसोली विभागाच्या हद्दीत असलेल्या ठिकाणी २९ ऑगस्ट रोजी गोठीवली गावातील मरीआई मंदिराजवळ मनपाकडे आलेल्या तक्रारीनुसार दोन मजल्याच्या अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली. त्यानुसार अतिक्रमण विभाग अधिकारी शंकर खाडे व अतिक्रमण अधिकारी रोहित ठाकरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली होती.
परंतु छायाचित्रात पाहिल्यास पालिकेचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांनी ३ सप्टेंबर रोजी पुनर्बांधणीला पुनश्च सुरुवात केली आहे.
पालिका अधिकाऱ्यांची ही कारवाई केवळ देखावा आहे की काय? विकासक व पालिका अधिकारी यांचे सुत जुळलेले आहे की काय? अशा अनेक प्रश्नांना तोंड फुटत असल्याची चर्चा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यापुढे मनपा यावर काय कारवाई करते याकडे प्रसार माध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे.