नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.०५.२०२०
नाशिक- करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे यामुळे सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मशिदींमध्ये फक्त चार लोकच नमाज पठण करीत आहे तर शुक्रवारची विशेष नमाज देखील एवढ्याच लोकांमध्ये होत आहे मात्र आता मुस्लीम बांधवांच्या सर्वात मोठा सण असलेल्या रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे . त्या दिवशी मुस्लीम बांधव ईदगाह मैदानावर व मशिदींमध्ये विशेष सामुदायिक नमाज पठण करतात , मात्र लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने नमाज होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे . दरम्यान , देशाची परिस्थिती लक्षात घेऊन तसेच करोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मुस्लीम बांधवांनी साध्या सोप्या पद्धतीने इस्लामी रितीरिवाजाप्रमाणे पवित्र रमजान ईद साजरी करावी असे आवाहन विविध मौलाना तसेच मान्यवरांनी केले आहे . त्याचप्रमाणे सोशल मीडिया या माध्यमातूनदेखील ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आव्हान करणारे पोस्ट फिरत आहे . एक प्रकारे सोशल मीडियावर ही मोहीम हळूहळू जोर धरत आहे . बाजारात शासनाने दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी अत्यंत कमी लोकच खरेदीसाठी बाहेर पडत आहे . जे लोक करोनाबाबतची माहिती सतत घेत नाही तेच लोक बाहेर पडत आहे . असे चित्र दिसत आहे . सध्या भद्रकाली बाजारासह मेनरोड , शालिमार आदी परिसरात अत्यंत तुरळक प्रमाणात मुस्लीम बांधव खरेदीसाठी दिसत आहेत . मात्र त्यांच्यातील उत्साह कमी दिसत आहे यामध्ये विशेष करून घरातील ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुला- मुलींसाठी खरेदी करण्यात येत असल्याचे समजते . दरम्यान , पवित्र रमजान महिन्याचे आता फक्त काही रोजे शिल्लक राहिले आहे यामुळे मुस्लीम बांधवांनी अधिक प्रमाणात इबादत करण्यास प्रारंभ केला आहे . रमजान महिन्यात तीन खंड असतात यामध्ये पहिला खंड रहमत दुसरा खंड मगफिरत तर तिसरा खंड म्हणजे शेवटच्या खंड असतो ते जहन्नमपासून मुक्तीचा असतो . २० रोजापासून शेवटचा खंड सुरू होतो याच वेळापासून मशिदींमध्ये रात्रीच्या वेळी होणारी तरावीची नमाजानंतर अलविदाचे पठाण देखील होते . त्याचप्रमाणे काही मशिदींमध्ये भाविक एतेकाफमध्ये देखील बसले आहे . २४ किंवा २५ रोजी चंद्र दर्शनाची शक्यता लक्षात घेऊन ईद साजरी करण्यात येणार आहे मात्र नमाज होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता दिसत नसल्याने मुस्लिमांमध्ये संभ्रम दिसत आहे . मिळालेल्या माहितीनुसार लॉक डाऊन मध्ये सामुदायिक नमाजची परवानगी मिळणार नसल्याचे समजते.