महाबळेश्वर : दि.३०.०४.१८ येथे तथागत गौतम बुद्ध यांची २५६२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी यावेळी धम्मदेसना दिली.यावेळी भारतातील चालू घडामोडींचा आढावा घेत तथागत गौतम बुद्धांचे विचारच जगाला तारू शकतात त्यामुळे आज २५०० वर्षांनंतर देखील जगाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे ही बाब त्यांनी विशद केली.यावेळी स्वप्ना मोरे,काजल गायकवाड,अजय कांबळे,अमोल काकडे,सुमीत कांबळे यांनी विचार व्यक्त केले.त्यानंतर सामूहिक खिर दानाचा कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमास बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या प्रदेशाध्यक्षा छायाताई शिंदे,शुभांगी शिंदे,कविता मोरे,अनिता मोरे,सुनंदा रोकडे,काजल गायकवाड,शीतल कांबळे,रंजना कांबळे,सुरेखा कांबळे,श्वेता मोरे,वंदना मोरे,स्वप्ना मोरे,श्रीदेवी वाघमारे,अंजना कसबे,प्रकाश जाधव,शाहीन पन्हाळकर,आलिया,नंदा मोरे,संगीता कांबळे,मधुमालती खरे,सुजाता मोरे,शांताबाई जाधव,किरण शिंदे,तालुकाध्यक्ष सुमित कांबळे,पंकज कांबळे,अनिकेत मोरे,गोरखनाथ शिंदे,अजय कांबळे,आकाश कांबळे,अमोल काकडे,नयन वने,सनी चव्हाण,कैलास रोकडे,अजिंक्य कांबळे,महेंद्र रोकडे,संपत मोरे,भिकन मोरे,दशरथ कांबळे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



















