चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४,०१,२०२०
नागभीड- महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडीचे वतीने NRC,CAA कायद्या विरोधात दि.२४ जानेवारी रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी मा.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत जुना बस स्थानक ते तहसील कार्यालय नाग भिड येथे मोर्चा काढून केंद्र सरकारने NRC व CAA कायद्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयात तहसीलदार चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले असून त्या आधी हा कायदा देशातील लोकांना कसा घातक परिणाम करणार आहे असे मत माजी मंत्री वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. रमेश कुमार गजभे, अरविंद संदेकर, अस्विन मेश्राम, राजकुमार मेश्राम, महिला आघाडीच्या अध्यक्षा खरात मॅडम यांनी हा कायदा देशातील लोकांना कसा घातक परिणाम करणार आहे सांगितले आणि घटना विरोधी विधेयक संसदेत मंजूर करण्यात आला यावर सर्वांनी मिळून मिसळून सहकार्य करून हा कायदा केंद्र सरकारने रद्द करण्यात यावा यासाठी सर्व ताकतीने प्रयत्न सुरू करून जनजागृतीसाठी तयार असावे. यासाठी पूर्ण वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी बंद यशस्वी केला.