पिंपरी(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०३.२०२४
चिंचवड- सध्या राज्यात उन्हाळ्याचा तडाखा वाढलेला दिसून येत असून तहानेने जनता व्याकूळ झालेली दिसत आहे. असे असताना पिंपरी चिंचवड मधील बिजलीनगर महावितरण कंपनीच्या कार्यालयात पिण्याचा पाण्यासाठी फिल्टरच्या पाण्याची सोय करण्यात आलेली दिसून येत असली तरी त्यासाठी वापरण्यात येणारी पाण्याची बाटली मात्र शेवाळलेली व अस्वच्छ असल्याचे निर्भीड पत्रकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामूळे विजेच्या तारेशी खेळल्या प्रमाणे जनतेच्या आरोग्याशी महावितरण खेळत आहे काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यावर संबधित अधिकाऱ्यांकडून काय कारवाई होते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.