चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.३०.११.१९
चिमूर – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई मार्फत इमारत व इतर बांधकाम कामगारांना सामाजीक सुरक्षा, आर्थीक, आरोग्य व शैक्षणिक या क्षेत्रातील एकोनतीस प्रकारचे लाभ दिले जातात या मंडळाची स्थापना २०११ ला झाली. प्रत्यक्ष लाभ २०१४ पासुन देण्यात येत आहे. मात्र शासनाच्या व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कामगारांची नोंदणी व प्रत्यक्ष लाभ देण्यात हयगय होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बरेच कामगार लाभापासुन वंचीत आहे. त्यामुळे न्याय हक्कासाठी कामगार रस्त्यावर उतरले आहे. कामगारांना न्याय मिळवून देन्यासाठी चिमूर येथील स्वराज्य बांधकाम कामगार संघटनाने पुढाकार घेवुन एकदिवसीय धरणे आंदोलण शुक्रवारला प्रशासनाच्या विरूद्ध तहसील कार्यालयासमोर केले. नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. अनेक ग्रामसेवक नाका प्रमाणपत्र देन्यास टाळाटाळ करीत आहे. चिमूर जिल्हयाची निर्मिती करून त्वरीत सहायक कामगार आयुक्त कार्यालय सुरू करावे, शंभर कामगारांची योग्य कागदपत्रासह सादर केल्यास कामगारांच्या सोयी ठीकाणी शिबीर आयोजीत करून नोंदणी करावी, राज्यात प्राधी कृत करन्यात आलेल्या नोंदणी अधिकारी यांना योग्य प्रशिक्षन देवून शंभर टक्के नोंदणी करून आदेशीत करावे, नोंदणी कार्यात हयगय करनाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, नोंदणी व लाभाच्या कामाकरीता मंजूरांची आर्थीक पिळवणूक त्यांचा शोध घेवून फौजदारी गुन्हे दाखल करावे नोंदणीकृत कामगारांना त्याच्या साठ वर्षानंतर मासीक सहा हजार पेंशन देण्यात यावे, आदी मागन्यासह एकविस मागन्याचे निवेदण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या समस्या त्वरीत निकाली काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधीकारी प्रकाश संकपाल मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवीन्यात आले आहे. मागन्याचे निवेदन देताना स्वराज्य बांधकाम संघटणा राज्याध्यक्ष धनराज गेडाम, राज्य सचिव देवचंद टेंभूरकर, राज्य कार्यालयीन सचिव नरेश पिल्लेवान, जिल्हा अध्यक्ष गडचिरोली बंडू सोनवाने, जिल्हा सचिव गडचिरोली संदीप कीरमीरे, राज्य प्रमुख संघटक गजानन शेडाम, जिल्हा अध्यक्ष रविंद्र गांगले, भाग्यवान नंदेश्वर, तुळशीदास बन्सोड, चिमूर तालुका कोषाध्यक्ष नरेंद्र शेंडे, ताजूल मेश्राम, मनोज राऊत, आकाश भगत आदी उपस्थीत होते .
निवेदणाच्या प्रतिलीपी मंत्री नितीन राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगण भूजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री सुभाष देसाई, मंत्री जयंत पाटील यांना पाठविल्या आहेत. धरणे आंदोलनाला जिल्हयातील कामगार उपस्थीत होते.



















