सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०३.२०२३
महाबळेश्वर- गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर शहरात कमी दाबाने नागरिकांना पाणी पुरवठा होत होता. नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रमजानच्या पवित्र महिन्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाई होऊ नये यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी केली होती. अन्यथा शहरातील हजारो महिलांच्या साथीने नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा बुद्धीस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिला होता. त्यावर आज रात्रीपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली असल्याने नियोजित हंडा मोर्चा रद्द करत असल्याची माहिती किरण शिंदे यांनी दिली असून नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.