मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.२३.०९.२०२२
नवी मुंबई- भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार २०२२ पर्यंत
” सभी भारत वासियों का घर होगा, घर में नल होगा, नल मे जल होगा, और प्रकाशमय कल होगा” परंतु हे सर्व राजकीय जुमले असून मत मागण्याचे राजकारणआहे याची प्रचिती नवी मुंबईतील २०१८-२०३८ विकास आराखडा (DP)नवी मुंबईतील झोपडपट्टी वासियांना डावलून बनविला गेला असल्याचे लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आले आहे.
नवी मुंबईतील एकूण ४० ते ५० वस्त्यांना यामध्ये डावलण्यात आले असून, याची खबरदारी म्हणून नवी मुंबईतील झोपडपट्टी धारकांना विकास आराखडा समजून घेण्याची गरज आहे. व त्या अनुषंगाने घर हक्क संघर्ष कृती समिती अध्यक्ष मा. हिरामण पगार रिपब्लिकन सेना जिल्हा प्रमुख ख्वाजामिया पटेल, विनिता बाळेकुंद्री, सुनिता खोत, कैलास सरकटे आधी लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखडा (DP)समजून घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांना दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता खारघर सेक्टर ७ येथील प्लॉट नंबर २३ युवा सेंटर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



















