मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०९.२०२२
🔹यापुढे साष्टे परिवाराकडून बदनामी सहन करून घेणार नाही!- तुलसीदास पाटील
नवीमुंबई- नवी मुंबईतील एमआयडीसी मार्फत प्रकल्पग्रस्त अंतर्गत मिळणारा भूखंड क्रमांक पी.एपी.आर ५ क्षेत्र १०० चौरस हा भूखंडा नियमाप्रमाणे २००६ साली हरिचंद्र रामचंद्र पाटील यांच्या अर्जानुसार रामचंद्र जोमा पाटील यांच्या नावावर झालेला होता. प्रकल्पग्रस्त अंतर्गत मिळालेल्या भूखंडाची खरेदी तुळशीदास पाटील यांनी केलेली आहे मात्र खरेदी केल्यानंतर देखील गुरुनाथ धनाजी साष्टे ,सावित्रीबाई धनाजी साष्टे आणि त्यांच्या बहिणी जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचा आरोप तुळशीदास पाटील यांनी रबाळे येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले आहे.
दरम्यान तुळशीदास पाटील यांनी आपली बाजू मांडताना असे म्हटले आहे की सदरचा क्रमांक असलेला भूखंड हा रीतसर हरिश्चंद्र रामचंद्र पाटील यांच्याकडून खरेदी करून कुलमुखत्यार मार्फत २०११ साली दुय्यम प्रबंधक कार्यालय ठाणे यांच्याकडे नोंदणी केलेला आहे तसे पत्र संबंधित कार्यालयाला वेळोवेळी देण्यात आलेले आहेत मात्र साष्टे कुटुंब पैशाच्या लालसेपोटी काहीतरी खोटा कांगवा करून माझी समाजामध्ये प्रतिष्ठा खराब करत आहेत हे उचित नसल्याने मी माझे म्हणणे पत्रकार परिषदेमध्ये मांडत आहे. याच पत्रकार परिषदेमधून मी त्यांना इशारा देतो की माझी नाहक बदनामी साष्टी परिवाराकडून थांबली नाही कायदेशीर अब्रूनुकसानीचा दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा तुळशीदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये तुळशीदास पाटील बोलताना म्हणाले की सन २०१० साली जमिनीची किंमत ही मोठ्या प्रमाणात कमी होती परंतु आज जमिनीचे दर मोठ्या प्रमाणत वाढले आहेत त्यामुळे साष्टे परिवार हव्यासापोटी माझ्याकडे जास्त पैशाची मागणी करून त्रास देत आहेत. त्यांच्याकडून माझ्या नावाची समाजामध्ये बदनामी सुरू आहे. यावरच न थांबता साष्टे परिवाराने उपोषण देखील केलेले आहे. मात्र उपोषणात कोणतेही तथ्य नसल्याकारणाने आज पर्यंत कोणती कारवाई झालेली नाही.
ही कारवाई होत नसल्याकारणाने त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महापे यांच्या विरोधात व माझ्या विरोधात देखील सोशल मीडियाच्या व इतर मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक चर्चा सुरू केलेली आहे ही चर्चा त्वरित न थांबल्यास प्रकल्पग्रस्तांचे नातेवाईक साष्टे परिवाराला कायदेशीर धडा शिकवू असा टोकाचा इशारा तुळशीदास पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेला आहे.



















