कठुआतील घटना बीभत्स असुन प्रधानमंत्री मोदींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन महिलांच्या सुरक्षे कडे लक्ष्य दयावे, अशी आशा अंतरराष्ट्रिय नाणे निधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनी यक्त केली आहे.क्रिस्तिना म्हणाल्या भारतामधे जे काही घडले ते घृणास्पद आहे. मला आशा आहे की नरेंद्र मोदी सरकार या कडे अधिक लक्ष्य देईल. कारण ही बाब भारतातील महिला साठी अतिशय महत्वाची आहे. दावोस मधे असताना क्रिस्तिना यांनी भारतीय महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला होता. दावोसच्या भाषणात मोदींनी भारतीय महिलांचा फारसा उल्लेख केला नव्हता.ही बाब क्रिस्तिना यांनी मोदींच्या लक्षात आणून दिली होती. भारतामधील जम्मू काश्मीर मधील कठुवा आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनांमुळे संपुर्ण देशात संतपाची लाट पसरलेली असतानाच अंतरराष्ट्रिय स्तरावरही या घटनांची दखल घेतली जात आहे.