पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०५.२०२०
पुणे- लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शरद भोजन योजना सुरु केली. जिल्ह्यातील कुणीही उपाशी राहणार नाही हा उद्देश ठेवुन गरजू कुटुंबाना धान्य देण्याची व्यवस्था पुणे जिल्हा परिषद या माध्यमातून करीत आहे.
सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. परिणामी या अर्थव्यस्थेशी संबंधित असलेला शेतमजूर, रोजंदारी कामगार आणि कष्टकरी वर्ग रोजगारा अभावी दोन वेळच्या जेवणापासून वंचित राहू लागला आहे. समाजातील वंचित व दुर्लक्षित वर्गाला धान्य मिळावे म्हणून जिल्हा परिषदेने सुरु केलेली शरद भोजन योजना खुपच उपयुक्त आहे. यावेळी मा.माऊलीभाऊ दाभाडे संचालक संत तुकाराम साखर कारखाना, सरपंच सुनिल दाभाडे, गोरख दाभाडे, सोपान दाभाडे मा.सरपंच, बजरंग जाधव, रोहिदास म्हसे, अनिल दाभाडे, कैलास दाभाडे, दत्तात्रय मावळे व इतर पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.