सोलापूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१२.०१.२०२०
नातेपुते- माळशिरस तालुक्यांतील नातेपूते गावामधे टपाल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस स्थानिकाकडून कचरा टाकला जात अाहे. रोज रोज कचरा टाकल्याने मोठा कचरा जमा झाल्यामुळे कार्यालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून या दुर्गंधीने कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यां नागरिकांना त्रासांला सामोरे जावे लागत आहे तर कर्मचाऱ्यांना दिवसभर तिथे थांबून काम करावे लागत असल्याने टपाल कर्मचारी त्रस्त आसून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबत कोणताही स्थानिक प्रतिनिधी गंभिर दिसत नाही याकडे प्रशासकीय, शासकीय अधिकारी लक्ष देतील का? आणि त्रस्त कर्मचाऱ्यांना त्रसातून मु्क्त करतील का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना कायम सतावत अाहे. या कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथे नळ कनेक्शन देवून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.