बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०१.२०२०
आष्टी- सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजना घरपोहोच करण्यासाठी आ. बाळासाहेब आजबे यांनी आष्टी-पाटोदा-शिरुर तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवते, पण त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचतातच असे नाही.
रेशनकार्ड न मिळणं, प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले उपचार न मिळणं, रेशन दुकानात पुरेसे धान्य न मिळणं, घरकुल अशा अनेक गोष्टींसाठी नागरिकांना झगडावे लागते. लाभार्थ्यांची निवड करण्यापासून योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यापर्यंत नियोजन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.